Jayant Patil on Wankhede। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत काल संगीता वानखेडे या मराठा आंदोलक महिलेनेही मोठे वक्तव्य करत जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. हे आरोप करताना वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावरही आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील जसं शरद पवार सांगतात तसंच ऐकतात असंही संगीता वानखेडे म्हणाल्या. या सगळ्या आरोपांवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.
जरांगेंचा शरद पवारांशी कधीही संपर्क नाही Jayant Patil on Wankhede।
संगीत वानखेडे यांनी केलेल्या आरोपांवर जयंत पाटील यांनी, “मनोज जरांगे यांच्याशी कधीही आदरणीय शरद पवार साहेबांचा संपर्क आलेला नाही, त्यांचा संपर्क कोणाशी आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असावे असा माझा अंदाज आहे. मुख्यमंत्री व मनोज जरांगे पाटील यांच्या संवादात कशामुळे विसंवाद तयार होतोय? याचा अभ्यास करून सरकारने अशी आंदोलने वारंवार होणार नाहीत याची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे” असा सल्ला देखील त्यांनी दिला.
हेही वाचा
“वोटबँक तयार करण्यासाठी….”; शरद पवारांचे नाव घेत मनोज जरांगेंवर संगीता वानखेडे यांचे गंभीर आरोप
मराठा आंदोलनामागे शरद पवारांचा हात Jayant Patil on Wankhede।
“मनोज जरांगेंनी कुठल्याही पक्षाच्या नेत्याला नीट उत्तर दिलं नाही. शरद पवार जेव्हा भेटायला गेले तेव्हा यांची भाषा बदलली होती. त्यावेळी मला वाटलं होतं मराठ्यांना आरक्षण मिळतंय ना? चांगलं होतं आहे. म्हणून मी साथ दिली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले की हा लगेच गुन्हे मागे घेण्याची मागणी करतो असाही आरोप संगीता वानखेडे यांनी केला.
“जे शरद पवारांना हवंय तेच या माणसाला पाहिजे आहे. या सगळ्यामागे शरद पवार आहेत. कारण शरद पवारांचा पक्ष संपला आहे. त्यामुळे राडा, गोंधळ आणि राडा घातला जातो आहे. शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणेच मनोज जरांगे वागतो” असाही आरोप संगीता वानखेडेंनी केला.