मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मविआच्या बाजूने आमचा निकाल लागेल असा दावा माध्यमांशी बोलतांना केला आहे.
मुंबईत पत्रकरांशी बोलतांना ते म्हणाले,”लोकशाहीत बहुमत आकड्यांवर चाललं, आकडा आणि बहुमत फार चंचल असतं, आता ही सगळी कायदेशीर लढाई आहे.कोण म्हणतं 40 आहे, कोण म्हणतं 140 आमदार त्यांच्याकडे आहेत. पण महाविकास आघाडी एकसंघ आहे. ज्या दिवशी हे आमदार मुंबईत येतील…मुंबईत आल्यावर त्या आमदारांची निष्ठेची, बाळासाहेबांवर भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागेल. सभागृहात हा विषय येईल, तेव्हा मविआच्या बाजूने आमचा निकाल लागेल.’ असं म्हणत पुढची अडीच वर्ष आमचं सरकार पूर्ण करणार असल्याचा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.