मुंबई – एकीकडे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकरल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी हा बंड कसा मोडीत काढता यईल यासाठी बैठकांचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे विरोधक पुन्हा सत्तेत येण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. या सर्व वेगवान राजकीय घडामोडींवर जनता बारकाईने लक्ष ठेवून असतानाच एका पत्राने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हे पत्र आहे पत्नी पीडित संघटनेच्या भारत फुलारे यांचं.
फुलारे यांनी एका पत्राद्वारे आपल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करावे अशी मागणी करत नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे.
काय आहे फुलारे यांचं हे पत्र पाहुयात.
फुलारेंची मागणी…..
विषय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला महाराष्ट्राचा पदभार देणे बाबत.
महोदय, महाराष्ट्रात सद्या स्थिर सरकार नसल्याने महाराष्ट्राच्या जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी देखील स्वतःचे राज्य सोडून जनतेची काळजी न करता खुर्ची व पदासाठी पर राज्यात जाऊन बसले. तसेच राज्याचे राज्यपाल यांना देखील दुर्दैवानं त्यांचा पदभार पर राज्यातील राज्यपालांना अतिरिक्त पदभार सोपावा ●लागला. त्यामुळं महाराष्ट्राची जनता अगदी पोरकी झाली आहे. महाराष्ट्रातील अश्या अघोरी राजकारणामुळे जनतेचे प्रश्न प्रलंबित राहू • लागले व जनता अगदी हतबल झाली आहे. म्हणून जोपर्यंत महाराष्ट्रातील राजकारण स्थिर होऊन मुख्य मंत्री पद स्थिर होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा प्रभारी पदभार हा जनतेच्या हिताचा सारासार विचार करून माझ्याकडे सोपवावा ही विनंती.
आपला
एड. भारत आसाराम फुलारे
संस्थापक अध्यक्ष पत्नी पीडित पुरूष आश्रम तथा कार्याध्यक्ष डावात मचाळा पार्टी औरंगाबाद, महाराष्ट्र.