मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी एका मुद्द्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर घणाघाती टीका केली होती. यावर प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांना पत्र लिहीत टीकेचे प्रत्युत्तर दिले आहे.
प्रविण दरेकर म्हणाले कि, ‘वर्षपूर्तीचा लेखाजोखा’ या पुस्तकाच्या निमित्ताने हा संवाद मी पत्ररुपाने आपल्याशी अत्यंत विनम्रतेने साधत आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर माझ्या पक्षाने १६ डिसेंबर २०१९ ला विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवली. विरोधी पक्ष नेता म्हणून गेल्या वर्षभरात केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा सादर करणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि याच कर्तव्य भावनेने मी हा लेखाजोखा तयार केलेला आहे.
@PawarSpeaks साहेब,
आपण विधानपरिषद विरोधीपक्षनेते होतो,याबद्दल आपणास कधीही वाईट वाटणार नाही,पदाचं अवमुल्यन झाल्याच शल्य राहणार नाही.याचा मला विश्वास आहे.
राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतोय. pic.twitter.com/fEufGzirFO— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 27, 2021
ज्यावेळी मी या पदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी सन १९६० पासून विधान परिषदेला विरोधी पक्ष नेत्यांची थोर परंपरा आहे. याची पला जाणीव होती आणि ही जाणीव सतत जागरुक ठेऊनच मी वर्षभरात विरोधी पक्ष येता. म्हणून कामकाज सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहे.
गेल्या वर्षांच्या सुरुवातीला संपूर्ण देश आणि महाराष्ट्र करोना महामारीशी झुंज देत होता. विरोधी पक्षात
असलो. विरोधी पक्ष नेता असलो तरी करोना महामारीशी महाराष्ट्र लढत असताना सरकारच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण सहकार्य करण्याचं अभिवचन आम्ही सरकारला दिलं. एक जबाबदार विरोधी पक्ष नेता या नात्याने करोना काळात सर्व काळजी घेऊन घराच्या बाहेर पडलो आणि अनेक क्वारंटाईन सेंटर्स, कोविड सेंटर्स, जम्बो कोविड सेंटर्स, विविध रुग्णालयांना भेटी देऊन तेथील उपाय-योजनातील त्रुटी, रुग्णांच्या व्यथा आणि करावयाचे बदल; याविषयी जाणून घेतलं त्या त्या महापालिका आयुक्तांबरोबर चर्चा केली आणि उपाययोजनातील त्रुटी कथी मंत्री महोदयांशी
प्रत्यक्ष संपर्क साधून तर कधी ११० पत्रं लिहून सरकारच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला.
सन २०२० च्या जून महिन्यात कोकणाला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. आणि एका रात्रीत संपुर्ण कोकण उध्द्वस्त झाले. त्यावेळी करोनाची साथही होती आणि प्रचंड वेगाने वारे वाहत असताना कशाचीही पर्वा न करता मी त्याच संध्याकाळी कोकणात जाण्याचा निर्णय घेतला आणि दोन दिवस कोकणवासियांमध्ये राहीलो, नुकसानीची पाहणी केली आणि प्रत्यक्ष बघितलेली वस्तुस्थिती सरकारच्या निदर्शनास आणून देऊन नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
मागच्या वर्षी जून ते ऑक्टोबर या काळात महाराष्ट्राच्या विविध भागात विशेषत: विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व कोकण या भागात मोठया प्रमाणावर अतिवृष्टी झाली व त्यामुळे लाखो शेतकरी संकटात सापडले होते. त्यावेळी मी राज्यातील जवळ जवळ सर्व अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या आणि नुकसानीचे पंचनामे असतील, पीक विम्याचे अर्ज असतील, तातडीची मदत असेल. नुकसानीचे पॅकेज असेल. याबाबतीत सरकारला जाग आणण्याचे काम केलं.
मी एक लहान कार्यकर्ता आहे. राज्यातील एक आदरणीय व जेष्ठ नेते म्हणून आपल्याकडे पक्षनिरपेक्षपणे पाहिले जाते आणि माझ्याही आपल्याबद्दल याच भावना आहेत. हा लेखाजोखा सादर करण्यामागे किंवा या पत्रद्वारा आपल्याशी संवाद साधण्यामागे स्वस्तुतीचा भाग गौण आहे, त्यापेक्षा विरोधी पक्षनेता म्हणून मी बजावलेले माझे निहित कर्तव्य आणि या पदाचा सन्मान वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत विनम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देण्याचा हा एक यथार्थ प्रयत्न आहे.
आजपर्यंतच्या विधान परिषदेच्या मा.विरोध पक्षनेत्यांनी त्यांचे वार्षिक कार्यअहवाल जनतेपुढे ठेवले किंवा नाही, याची मला कल्पना नाही. परंतु पक्षाने, पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारीचे निर्वहन जनतेसाठी कसे केले , याची माहिती अहवालरुपाने देण्याचा उद्देश “वर्षभराचा लेखाजोखा” हे पुस्तक प्रकाशित करण्यामागे आहे, ज्याचे प्रकाशन उद्या, दि. 28 जानेवारी 2021 रोजी होणार आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.