मुंबई – बेळगाव सोडा, मुंबईही आमचाच भाग आहे, असे विधान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लक्ष्मण सवदी यांना फटकारले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे कर्नाटकच्या सरकारने विसरू नये. या विषयावर पावले टाकायला सुरूवात केलेली आहे. कुणी तिकडं काही बरळलं तरी इकडं आम्हाला फरक पडत नाही, असे संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले कि, काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं. तेव्हा त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अन्य नेते होते. कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळाले पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे.
सीमावाद पुन्हा पेटला ! महाराष्ट्राने बेळगाव घेऊन मुंबई कर्नाटकाला द्यावी
तसेच, मुंबई, महाराष्ट्रात जे आमचे कानडी बांधव राहतात, आम्ही त्यांच्यावर कुठलीही सक्ती केलेली नाही. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे. येथे कानडी शाळा आम्ही चालवतो. आम्ही कानडी शाळांना अनुदान देतो. येथे अनेक कानडी संस्था देखील चालवल्या जातात. पण बेळगाव सारख्या भागात ही परिस्थिती आहे का? ही लढाई कशासाठी आहे? ही लढाई आपली भाषा आपली संस्कृती टिकवण्यासाठी आहे. आम्ही काय देशाच्या बाहेर जा असं कधी कुणाला म्हणत नाही, असेही संजय राऊतांनी म्हंटले आहेत.