Lok Sabha Election 2024 – काँग्रेसने काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० आणू नये आणि अयोध्येतील राम मंदिराला त्यांनी पुन्हा बाबरीचे कुलुप लाऊ नये म्हणून आम्हाला लोकसभेत चारशे जागा हव्या आहेत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
मध्य प्रदेशातील धार येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना, मोदींनी काँग्रेसवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तुच्छ लेखल्याचा आरोपही केला. संविधान बनवण्यात त्यांची फारच कमी भूमिका असल्याचे कॉंग्रेसनेच सांगण्यास सुरुवात केली.सत्य हे आहे की काँग्रेस परिवार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार करतो,असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की काँग्रेस अफवा पसरवत आहे की जर त्यांना लोकसभेच्या ४०० जागा मिळाल्या तर ते राज्यघटना बदलतील. काँग्रेसच्या लोकांची बुद्धिमत्ता त्यांच्या व्होट बँकेवर केंद्रित आहे, त्यामुळेच ते असा आरोप करीत आहेत असेही मेादींनी नमूद केले.
देशातील लोकानी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे आधीच संसदेत 400 पेक्षा जास्त जागा आहेत. त्याचा वापर आम्ही आम्ही कलम ३७० रद्द करण्यासाठी या केला.
आम्ही आमच्याकडे चारशे जागा असूनही त्यावेळी घटना बदलली नाही. पण याही वेळी आम्हाला चारशे जागा हव्या आहेत कारण कॉंग्रेसने पुन्हा कलम ३७० कलम देशात पुन्हा आणता कामा नये आणि त्यांनी अयोध्येतील राम मंदिराला बाबरीचे कुलुप लावता कामा नये.
पंतप्रधान म्हणाले की, सुमारे १४ दिवसांपूर्वी आपण काँग्रेसला देशातील जनतेला धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाही असे लिखित स्वरूपात देण्याचे आव्हान दिले होते.
सध्याच्या ओबीसी कोट्यातून आरक्षण लुटून मुस्लिमांना आरक्षण कधीच देणार नाही असंही लेखी द्यावं असे आवाहन आपण त्यांना दिले हेाते, पण ते प्रतिसाद देत नाहीत आणि तोंडाला कुलूप लावून शांत बसले आहेत, असे ते म्हणाले.
आम्ही अनुसूचित जाती जमातींचे आरक्षण १० वर्षांसाठी वाढवण्यासाठी, प्रथमच देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी महिलेची नियुक्ती करण्यासाठी आणि महिलांना आरक्षण देण्यासाठी या ४०० पेक्षा जास्त जागांचा वापर केला आहे, पण इंडिया आघाडीने जे षडयंत्र रचले आहे, ते रोखण्यासाठी आम्हााला चारशे जागा हव्या आहेत.