मुंबई – राज्यातील करोनाबाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 46,723 नवीन करोना रुग्णांची भर झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 28,041 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात मंगळवारच्या तुलनेत आज जवळपास 12 हजार अधिक रुग्णांची भर पडल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे राज्यात आज 86 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1367 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 734 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. तसेच दिवसभरात 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 66 लाख 49 हजार 111 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.52 टक्क्यांवर पोहोचले आहे.
सध्या राज्यात 15 लाख 29 हजार 452 व्यक्ती होम क्वॉरंटाईन, तर 6951 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.