Ranji Trophy 2024 Semi-Final 1 ( #VIDvMP ) : – रणजी ट्रॉफी 2024 च्या विजेतेपदाच्या सामन्यात मुंबई आणि विदर्भ हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. मुंबईने पहिल्या उपांत्य फेरीत तामिळनाडूचा धुव्वा उडवत आधीच थाटात अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्याचा निकाल 3 दिवसात लागला. तर, दुसऱ्या उपांत्य फेरीत विदर्भाने 2021-22 च्या चॅम्पियन मध्य प्रदेशला 62 धावांनी धूळ चारून अंतिम फेरी गाठली आहे. विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यात झालेल्या उपांत्य फेरी सामन्याचा निकाल शेवटच्या दिवशी लागला.
उपांत्य फेरीच्या पाचव्या दिवशी विदर्भ आणि मध्यप्रदेश हे दोन्ही संघ एकमेकांना कडवी झुंज देत असताना, विदर्भाला 4 विकेट्सची तर मध्यप्रदेशला अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी 93 धावांची गरज होती, पण विदर्भाच्या गोलंदाजांनी मध्य प्रदेशाच्या उर्वरित फलंदाजांना दिवसाच्या सुरूवातीलाच गुंडाळले आणि रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचवले. 10 मार्चपासून अंतिम सामना खेळवला जाणार आहे. विदर्भ संघानेही दोनदा विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी 2017-18 मध्ये दिल्ली आणि 2018-19 मध्ये सौराष्ट्रचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
Presenting the finalists of the @IDFCFIRSTBank #RanjiTrophy 2023-24! 👏👏
Mumbai 🆚 Vidarbha
🗓️ 10th to 14th March
🏟️ Wankhede Stadium, Mumbai#Final | #MUMvVIDFollow the match LIVE on https://t.co/pQRlXkCguc and the official BCCI App pic.twitter.com/gmnCSIeVBz
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 6, 2024
नागपुरात खेळल्या गेलेल्या या सामन्यात विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशचा पहिला डाव 252 धावांवर संपला. त्यांनी 82 धावांची आघाडी घेतली. विदर्भाने दुसऱ्या डावात 402 धावा केल्या आणि त्यातून 82 धावा वजा केल्यावर त्यांची आघाडी 302 धावांची झाली. अशाप्रकारे मध्य प्रदेशला 303 धावांचे लक्ष्य मिळाले. 303 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मध्य प्रदेशचा दुसरा डाव 258 धावांवर आटोपला.
सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी सकाळी मध्य प्रदेशने आपला दुसरा डाव 6 विकेट्सवर 228 धावांनी पुढे सुरू केला. त्यानंतर ते लक्ष्यापासून 93 धावांनी मागे होते पण ठाकरे आणि ठाकूर (दोन्ही प्रत्येकी दोन विकेट्स) यांच्या वेगवान गोलंदाजीचा सामना त्याच्या तळाच्या फलंदाजांना करता आला नाही आणि त्याचा संपूर्ण संघ 81.3 षटकांत 258 धावांत गारद झाला.
कसा होता पाच दिवसांचा खेळ….
विदर्भाने पहिल्या डावात 170 धावा केल्या होत्या. करुण नायरने 63 धावांची तर अथर्व तायडेने 39 धावांची खेळी खेळली. एमपीसाठी आवेश खानने चार गडी बाद केले, तर कुलवंत खेजरोलिया आणि व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने पहिल्या डावात 252 धावा केल्या. हिमांशू मंत्रीने सर्वाधिक 126 धावांची खेळी केली. तर सरांश जैनने 30, सागर सोलंकीने 26 आणि हर्ष गवळीने 25 धावा केल्या. विदर्भाकडून उमेश आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर, वखारेने दोन गडी बाद केले.
यानंतर विदर्भाने दुसऱ्या डावात 402 धावा केल्या. यश राठोडने सर्वाधिक 141 धावांची खेळी केली. तर अक्षय वाडकरने 77, अमन मोखाडेने 59 धावा आणि ध्रुव शौरेने 40 धावा करत महत्वपूर्ण योगदान दिले. एमपीसाठी अनुभव अग्रवालने पाच, तर कुलवंत आणि कार्तिकेयने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
303 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मध्य प्रदेशचा संघ दुसऱ्या डावात 258 धावांत गारद झाला. यश दुबेने 94 धावा केल्या तर हर्षने 67 धावांची खेळी केली. विदर्भाकडून यश ठाकूर आणि अक्षय वखारे यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. त्याचवेळी आदित्य सरवटे आणि आदित्य ठाकरे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.