Mumbai Beat Tamil Nadu Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफी 2024 च्या पहिल्या अंतिम फेरीतील संघाचे नाव निश्चित झाले आहे. रणजी ट्रॉफी 2024 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई आणि तामिळनाडूचे संघ आमनेसामने होते. हा सामना मुंबईतील शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसी मैदानावर खेळला गेला आणि तीन दिवसांत संपला. या सामन्यात मुंबईने तामिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. मुंबई संघाने 48व्यांदा रणजी फायनलमध्ये प्रवेश केला असून हा संघ 41वेळा चॅम्पियन बनला आहे.
𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢 𝐜𝐫𝐮𝐢𝐬𝐞 𝐢𝐧𝐭𝐨 𝐭𝐡𝐞 𝐟𝐢𝐧𝐚𝐥! 👏
A superb performance from the @ajinkyarahane88-led side as they beat Tamil Nadu by an innings and 70 runs in Semi Final 2 of the @IDFCFIRSTBank #RanjiTrophy 🙌#MUMvTN | #SF2
Scorecard ▶️ https://t.co/9tosMLk9TT pic.twitter.com/bOikVOmBn1
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 4, 2024
रणजी ट्रॉफी 2024 च्या अंतिम फेरीत मुंबई संघ…
या सामन्यात मुंबई संघाने तामिळनाडूचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात तामिळनाडू संघाने पहिल्या डावात 146 धावा केल्या आणि त्यानंतर मुंबई संघाने पहिल्या डावात 378 धावा करत 232 धावांची मोठी आघाडी घेतली. यानंतर तामिळनाडूची फलंदाजी दुसऱ्या डावात पुन्हा फ्लॉप झाली आणि 162 धावांत सर्वबाद झाली. अशा परिस्थितीत मुंबईने हा सामना एक डाव आणि 70 धावांनी जिंकला. आता अंतिम फेरीत मुंबईचा सामना विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यातील उपांत्य फेरीतील विजेत्याशी होणार आहे.
शार्दुल ठाकूर ठरला विजयाचा हिरो….
या सामन्यात अष्टपैलू शार्दुल ठाकूर मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. या सामन्याच्या पहिल्या डावात शार्दुल ठाकूरने शानदार शतक झळकावले. एकवेळ पहिल्या डावात मुंबई संघाने 106 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या. यानंतर शार्दुल ठाकूर मैदानात आला आणि त्याने संघाचे सामन्यात पुनरागमन केले. शार्दुलने 105 चेंडूत 109 धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून 13 चौकार आणि 4 षटकार आले. विशेष म्हणजे शार्दुल ठाकूरच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीतील हे पहिले शतक होते. याशिवाय या सामन्यात त्याने 4 विकेट्सही आपल्या नावावर केल्या. शार्दुलने ज्या परिस्थितीत हे शतक झळकावले ते दीर्घकाळ स्मरणात राहील.
मुशीर खाननेही अर्धशतक झळकावले
मागील सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या मुशीर खानने या सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावले. 131 चेंडूत 55 धावा करून तो बाद झाला. याशिवाय टीम इंडियातून बाहेर पडलेले श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे या सामन्यात फ्लॉप ठरले. श्रेयस अय्यरने केवळ 3 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणे 19 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.