नवी दिल्ली – भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राहुल गांधींवर त्यांनी लोकशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, जे लोक लोकशाहीवर विश्वास ठेवत नाहीत त्यांना लोकशाहीत स्थान नाही. चेन्नई येथे आयोजित भारतीय जनता युवा मोर्चाच्या ‘राष्ट्रीय युवा संसद’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कॉंग्रेस मानसिकदृष्ट्या दिवाळखोर बनली आहे, असा आरोप करताना नड्डा म्हणाले की, राहुल गांधींनी भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचा “बेफिकीर” दावा करून अमेरिका आणि युरोपियन देशांसारख्या परदेशी शक्तींना भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यास “प्रवृत्त” केले आहे. याद्वारे राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, असे ते म्हणाले.
केंद्रीयमंत्री रिजीजूंचे वक्तव्य म्हणजे न्याय व्यवस्थेला धमकावण्याचा प्रकार – संजय राऊत
राहुल गांधी यांनी भारताच्या लोकशाही मूल्यांबद्दल लज्जास्पद वक्तव्य करून केवळ देशाचा अपमान केला नाही तर परदेशी राष्ट्रांना आपल्या देशात हस्तक्षेप करण्यास आमंत्रित केले आहे, असे भाजप अध्यक्ष म्हणाले.
Elections 2024 : विधानसभेच्या जागा वाटपाबाबत बावनकुळे यांचे घुमजाव, म्हणाले “अजून जागा…”
दरम्यान, आपल्यावरील खोट्या आरोपांबाबत आपल्याला संसदेत बोलू दिले पाहिजे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे, पण त्यांना भाजपने अजून तशी परवानगी दिलेली नाही. यावर मात्र नढ्ढा यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.