Amit Shah And Rahul Gandhi| लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. यादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपला लोकांचा पाठिंबा पूर्वीपेक्षा वाढला आहे, असा दावा त्यांनी केला. याशिवाय कॉंग्रेसची तुष्टीकरणाची सवय जुनी असून त्यांनी आता ती पुन्हा सुरू केली असून त्यांना या देशात मुस्लीम पर्सनल कायदा कायम ठेवायचा आहे. त्यांना शरीयानुसार हा देश चालवायचा आहे काय? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले अमित शाह? Amit Shah And Rahul Gandhi|
अमित शाह म्हणाले, “भाजपने आपल्या जाहीरनाम्यात एकसमान नागरी संहिता (यूसीसी) आणणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. आम्ही तिहेरी तलाक रद्द केला आणि आता समान नागरी कायदा देशात लागू करू. राहुल गांधी वैयक्तिक कायद्याबद्दल बोलतात, जे देशाचे विभाजन करणारे आहे. या देशात वैयक्तिक कायदे लागू होऊ शकत नाहीत. मला विश्वास आहे की नरेंद्र मोदी हेच देशात पुन्हा पंतप्रधान होतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मतदारांना सुरक्षित आणि समृद्धीसाठी आपल्या शब्दांवर ठाम असलेल्या पक्षाला निवडून देण्याचे आवाहनही केले.
#WATCH | Bhopal, Madhya Pradesh: On the second phase of #LokSabhaElections2024, Union Home Minister Amit Shah says, “…First of all, I would like to appeal to the voters to elect a party that stands on its words – for secure and prosperous country and welfare of the poor…After… pic.twitter.com/I3j4z2TieA
— ANI (@ANI) April 26, 2024
तत्पूर्वी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसला फटकारले देशात ‘शरिया कायदा’ लागू करण्याचा आणि लोकांच्या मालमत्तेचे पुनर्वितरण करण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अमरोहा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना असा दावा केला की, काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात देशात ‘शरिया कायदा’ लागू करण्याचा आपला इरादा व्यक्त केला आहे, ज्यामुळे संविधानाला धोका निर्माण झाला आहे.
वास्तविक भाजप काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरच हल्लाबोल करत आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची छाप दिसत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज सांगतात. पीएम मोदींनी अलीकडेच राजस्थानमध्ये दावा केला होता की, “काँग्रेसचा जाहीरनामा सांगत आहे की ते माता-भगिनींच्या सोन्याची मोजणी करतील, त्याची माहिती घेतील आणि नंतर त्या संपत्तीचे वाटप करतील. ज्यांच्याबद्दल मनमोहन सिंग यांच्या सरकारने म्हटले होते की, मालमत्तेवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, त्यांना वितरित करू. यावर काँग्रेसने पलटवार करत म्हटले की, पंतप्रधान मोदी हे खरे मुद्द्यांवरून लक्ष वळवण्यासाठी हे बोलत आहेत. Amit Shah And Rahul Gandhi|
हेही वाचा:
त्रिपुरामध्ये सर्वाधिक 54.47 टक्के मतदान; दुपारी 1 वाजेपर्यंत कुठे, किती मतदान झाले? याचा