इंदापुरात रंगल्या अभंग स्पर्धा
इंदापूर : पंढरीचा पांडुरंग गोरगरिबांचा रंजल्या गांजल्यांचा विटेवर उभा असलेला देव आहे.ज्यांच्या मुखात हरीचे नाम असेल त्यांच्याकडून कधीही चुकीचे काम होत नाही.त्यामुळे हरिनामाला महत्त्व दिले पाहिजे अभंग गायले पाहिजेत असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग व भजन स्पर्धा इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे रविवारी स्पर्धेचा प्रारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते हरिनामाच्या गजरात करण्यात आला. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर,वेल्हा, मुळशी, हवेली, आणि पुणे शहरातील गायक कलावंत भजनी मंडळे यांच्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.भजनी मंडळांना मार्गदर्शन करताना खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.
यावेळी स्पर्धा प्रमुख अभिनव गंधर्व रघुनाथ खंडाळकर,समन्वयक विवेक थिटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष एडवोकेट तेजसिंह पाटील,तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील,राज्य कार्यकारणी सदस्य अमोल भिसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, तालुका उपाध्यक्ष शिकंदर बागवान, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत निंबाळकर, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.इंदापूर तालुक्यातील ४१ भजनी मंडळ या स्पर्धेत सहभागी झाले.
पुढे बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हरिनामाच्या अभंगाबरोबरच पाण्याचे महत्व मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध कारणामुळे जागतिक तापमानात बदल होऊन सातत्याने ऋतुचक्र बदलत चालले आहे. त्यामुळेच पर्जन्यमान कमी होत आहे. पाणीटंचाईचा सामना यामुळेच आपणास सोसावा लागतो आहे.
पाण्याची बचत हा एक प्रमुख उपाय यावर रामबाण आहे. त्यामुळेच की भजन स्पर्धा स्वच्छता आणि पाणी वाचवा याच विषयावर आयोजित केल्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती होणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केले.तर आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील यांनी मानले.