जळोची : बारामती शहरातील एका तरुणीच्या मर्जीविरुद्ध तिला पळवून नेऊन लग्न केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन ऋषिकेश अविनाश जगताप (रा. कोळी मळा बारामती)शुभम कराळे,किरण खोमणे (रा. बारामती) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची हकीकत अशी की,बारामती शहर पोलीस ठाण्यात {दि.३० जाने}रोजी पीडित मुलगी पुण्याला एसटी मधून जात असताना ती पुण्यामध्ये पोहोचली नसल्याने त्याबाबत मिसिंग दाखल करून घेतले. सदरचा तपास करून मुलीला पोलीस ठाण्यात आणले असता. सदर मुलीने तक्रार दिली की तिची सहा महिन्यापासून ऋषिकेश जगताप याच्यासोबत ओळख होती.
ओळखी नंतर ऋषिकेश हा तिचा सतत पाठलाग करायचा. ती त्याला विरोध करत होती. परंतु तो तिला लग्नाची मागणी घालत होता. तिची त्याच्यासोबत लग्न करण्याची मानसिकता नव्हती. सदर मुलीच्या नातेवाईकांनी तिला पुण्याला जाण्यासाठी बारामती एसटी स्टँडवर सोडवली. ही माहिती ऋषिकेशला समजली. त्याने सदर मुलीगी ज्या एसटीमधे होती. तिचा पाठलाग करून कसबा या ठिकाणी बस थांबवली व तिला खाली उतरण्यास सांगितले. परंतु सदर मुलीने त्याचे ऐकले नाही. नंतर सदर मुलाने त्या मुलीस मोबाईलवर फोन करून सांगितले की तु जर एसटीमधून उतरली नाही आणि माझ्यासोबत आली नाही तर तुझ्या भावाला मारून टाकून स्वतःही आत्महत्या करेल. यामुळे सदर मुलगी भयभीत होऊन शिवरी या ठिकाणी एसटी मधून खाली उतरली.यावेळेस आरोपी ऋषिकेश जगताप याने तिला सोबत घेऊन आळंदी या ठिकाणी तिच्या मर्जीविरुद्ध तिच्या सोबत विवाह केला. सदर विवाहाला शुभम कराळे व किरण खोमणे हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते.
सदर महिला ही पोलीस ठाण्यात आल्यानंतर तिने वरील सर्व विरुद्ध तिचा विनयभंग केला व तिच्या मर्जीविरुद्ध आळंदी या ठिकाणी विवाह केला असल्याची फिर्याद दिली पोलिसांनी या प्रकरणी ऋषिकेश जगताप व शुभम काळे यांना अटक केली असून किरण खोमणे हा फरारी आहे. सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय युवराज घोडके करत आहेत.