नवी दिल्ली– देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा चौथा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात कोणाला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यामध्ये कर सवलतीत मागील पाच वर्षांपासून कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. तर शेतकरी, विद्यार्थी वर्गाला काही प्रमाणात दिलासा देण्यात आलेला आहे.
-काही रसायनांवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा प्रस्ताव आहे, यामध्ये मिथेनॉलचाही समावेश आहे.
-स्टील भंगारावरील कस्टम ड्युटीमध्ये सूट आणखी एक वर्ष वाढवण्यात येत असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.
-इलेक्ट्रॉनिक वस्तूही स्वस्त होणार आहेत.
-अर्थसंकल्पानंतर (Budget 2022) कृषी माल स्वस्त होणार आहे.
-कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवर कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. म्हणजेच तेही स्वस्त होणार आहेत होतील.
-मोबाईल फोन चार्जरच्या ट्रान्सफॉर्मर आणि कॅमेरा लेन्सवरील आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. घरगुती मोबाईल फोन चार्जर स्वस्त होणार आहेत.
-देशात असेंबल केलेले मोबाईलही स्वस्त होऊ शकतात. देशांतर्गत स्तरावर मोबाईल (Mobile) उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
-परदेशातून येणारी यंत्रसामग्रीही स्वस्त होणार आहे.
– कापड आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार.
-त्याचबरोबर छत्र्यांची खरेदी महाग होणार आहे. छत्र्यांवर कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.