मुंबई – भाजप पक्ष सध्या फुटीच्या उंबरठ्यावर असल्यामुळेच राजभवनाचे रुपांतर भाजप कार्यालयात करण्यात आली. अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज भारतीय जनता पक्षावर केली आहे. ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
राज्यपालांनी विधानपरिषेदत महाविकासआघाडीच्या 12 आमदारांची नियुक्ती केली तर भाजपमधील अनेकजण पक्षातून बाहेर पडतील अशी भीती भाजपला असल्याचा नाना पटोले यांनी दावा केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. हे टाळण्यासाठी राज्यपालांचा वापर सुरू आहे. राज्यपाल भवन आता भाजपा कार्यालय झाले आहे. मागिल काळाज भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना भाजपमध्ये राहून आपण मंत्री होणार नसल्याचे कळाले आहे. त्यामुळे ते फुटणार आहेत. असा दावा पटोले यांनी केला आहे.
आठ दिवसांत आम्ही मंत्रिमंडळ बदलू, सत्तेत येऊ. पण हे करता करता आता दोन वर्षे पूर्ण होत आली. आणि आता भाजपामध्ये खूप चलबिचल सुरू झाली आहे. भाजपाचे अनेक नेते, आमदार माझ्या संपर्कात आहेत. दुसऱ्याही पक्षाचे असतील. म्हणून हे बारा आमदार ज्यादिवशी या महाविकास आघाडीचे होतील, त्या दिवशी पक्ष फुटेल याची भीती त्यांच्या मनात आहे.