नवी दिल्ली – देशात 2024 या वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल. जनतेच्या आशीर्वादामुळे मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील, असे भाकीत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी शनिवारी केले.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे भाष्य कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी केले. त्या पार्श्वभूमीवर, दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सर्मा यांनी पंतप्रधान म्हणून मोदींना सलग तिसरा कार्यकाळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
Karnataka Assembly Elections 2023 : स्वबळावर निवडणूक लढू आणि सरकारही स्थापन करू – अमित शहा
कुणीही पंतप्रधानपदाचे उमेदवार बनू शकते. त्यामध्ये काहीच गैर नाही. पण, देशाचे आणि भाजपचे मोदी हेच पंतप्रधानपदाचे एकमेव उमेदवार आहेत, असे त्यांनी म्हटले. सिल्व्हर किंवा ब्रॉंझ मेडल कुणाला मिळणार याची चिंता मी करत नाही, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.