नवी दिल्ली – आज संपूर्ण देश ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सलग 10व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. त्यांनी यावेळी ९० मिनिटांचे भाषण केले. भाषणा दरम्यान, पंतप्रधानांनी मणिपूर हिंसाचार, सुधारणांबाबत भूमिका स्पष्ट केली.
#WATCH | PM Narendra Modi says, “The world has still not recovered from Corona. The war gave rise to another crisis. Today, the world is facing the crisis of inflation. Inflation has the entire global economy in its clutches…It is unfortunate that when we import goods of our… pic.twitter.com/hTsykudGSc
— ANI (@ANI) August 15, 2023
यासोबतच त्यांनी मोदी सरकारच्या 10 वर्षातील कामांचा लेखाजोखा मांडला. कुटुंबवाद, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण या तीन गंभीर प्रश्नांपासून राजकारण मुक्त करण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी देशवासीयांना तीन हमी दिल्या.
पहिली- येत्या काही वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल.
दुसरी – शहरांमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना बँकेच्या कर्जात सवलत मिळेल.
तिसरी – म्हणजे देशभरात 10 हजार ते 25 हजारांपर्यंत जनऔषधी केंद्रे उघडली जातील.