आज संपूर्ण देश ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सलग 10व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. त्यांनी यावेळी ९० मिनिटांचे भाषण केले. भाषणा दरम्यान, पंतप्रधानांनी मणिपूर हिंसाचार, सुधारणांबाबत भूमिका स्पष्ट केली.
यावेळी पीएम मोदी म्हणाले,’पुढील 15 ऑगस्ट २०२३ ला याच लाल किल्ल्यावरून मी आपल्या देशाची यश, गौरव मी तुमच्यासमोर सांगताना दिसेल. मी तुमच्यातून आलोय, मी तुमच्यासाठी जगतोय. मी स्वप्न पाहतो तर ते फक्त तुमच्यासाठीच, मी घाम गळतो तर फक्त तुमच्यासाठीच. यासाठी नाही की तुम्ही मला निवडून आणले आहे. मला ही जबाबदारी दिली म्हणून नाही तर तुम्ही माझा परिवार आहेत म्हणून मी हे करत आहे. ‘ असं म्हणत मोदी यांनी अप्रत्यक्षपणे २०२४ ;लोकसभा निवडणुकीतून पुन्हा पंतप्रधान होण्याची घोषणा केली आहे.
तत्पूर्वी, त्यांनी मोदी सरकारच्या 10 वर्षातील कामांचा लेखाजोखा मांडला. कुटुंबवाद, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण या तीन गंभीर प्रश्नांपासून राजकारण मुक्त करण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी देशवासीयांना तीन हमी दिल्या.
पहिली- येत्या काही वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल.
दुसरी – शहरांमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना बँकेच्या कर्जात सवलत मिळेल.
तिसरी – म्हणजे देशभरात 10 हजार ते 25 हजारांपर्यंत जनऔषधी केंद्रे उघडली जातील.