मुंबई – बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर देताना अपशब्द वापरले. सत्तार यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहेत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपहार्य वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँगेस आक्रमक झाली आहे.
त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष आणि महाविकासआघाडी चा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्र राज्यात मंत्री अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्र राज्यात फिरू देणार नाही. अशी आक्रमक भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी घेतली आहे.
सचिन खरात यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्र राज्य माँ जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीमाई, माता रमाई, अहिल्याबाई यांचे राज्य आहे. तरीसुद्धा महाराष्ट्र राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यापासून अब्दुल सत्तार वादग्रस्त वक्तव्य करत आहे आता त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल चुकिचे वक्तव्य केलं आहे यावरून स्पष्ट दिसून येत आहे हे सरकार मनूस्मृतीच्या विचारावर चालत आहे.
मंत्री #अब्दुलसत्तार यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा राज्यात फिरू देणार नाही… सचिन खरात#Maharashtra@abpmajhatv @TV9Marathi @saamTVnews @News18lokmat @JaiMaharashtraN @zee24taasnews @SakalMediaNews @lokmat @LoksattaLive @mataonline @pudharionline @SaamanaOnline @mumbaitak pic.twitter.com/J6jLqSeT5u
— SACHIN KHARAT RPI राष्ट्रीय अध्यक्ष (@RPIsachinkharat) November 7, 2022
पुढे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातुन हाकलपट्टी करावी अशी मागणी केली आहे. तसेच मंत्री अब्दुल सत्तार यांनी तात्काळ खासदार सुप्रिया सुळे यांची माफी मागावी अन्यथा मंत्री अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्र राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.