मुंबई – शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आज एकमोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लावणे हा राजकारणाचा एक भाग होता.
उद्धव ठाकरे यांना भावनिक करून राजीनामा द्यायला लावण्याचा आणि नंतर भाजपसोबत जाण्याचा शरद पवार यांचा डाव होता. हे सर्व राजकारण शरद पवार यांनी केले. त्यांना संजय राऊत यांचा पाठिंबा होता, असा गौप्यस्फोट संजय शिरसाट केला.
संजय शिरसाट म्हणाले. राऊत हा कुणाचा माणूस विचारले तर ते शरद पवार यांचा माणूस आहे असे म्हणणार. देवेंद्र फडणवीस हा नेता यांना भारी पडला म्हणून यांची पोटदुखी आहे. सत्तेपासून वंचित राहिल्याने ते असे करतात.
तसेच देशात राम मंदिर उभारल्याचे यांना समाधान नाही. त्यांना दुःख यांचे आहे की, जमिनीचे व्यवहार झाले असतील, आम्हाला न विचारता कसे झाले? असे त्यांना वाटत असेल.
गर्व से कहो हम हिंदू है ही बाळासाहेबांची गर्जना विसरले. मुंबई तोडण्याची भाषा यांना निवडणूक आल्यावरच समजते. चुकीच्या गोष्टी बिंबवण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो, अशी टीका त्यांनी केली.