नवी दिल्ली – कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत 300 जणांचा मृत्यू झाला असून, 15 हजारापेक्षा जास्त नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. मात्र, यावर आता औषध शोधल्याचा दावा थायलंडमधील एका डॉक्टरने केला आहे. या औषधाने एका रुग्णाला फायदा झाला असल्याचेही सांगितले आहे.
थायलंडमधील डॉ. क्रिएंगसक एटिपोर्नवानिच यांनी कोरोना विषाणूंवर औषध तयार केले आहे. ते म्हणाले कि, ७० वर्षाच्या महिलेला कोरोना विषाणूची लागण झाली होती. तिच्यावर उपचार करण्यात यश आले आहे. उपचारानंतर ४८ तासांनी झालेल्या लॅब टेस्टमध्ये तिच्या शरीरात कोरोनाचा विषाणू आढळला नाही. एवढेच नव्हे तर उपचारानंतर १२ तासांनी त्या चालयालाही लागल्या, असे डॉ. एटिपोर्नवानिच यांनी सांगितले.
डॉ. एटिपोर्नवानिच पुढे म्हणाले, कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णावर उपचारासाठी अॅन्टी-वनायरलच्या कॉम्बिनेशनने तयार करण्यात आलेल्या औषधाचा वापर करण्यात आला आहे. हे औषध ताप आणि एचआयव्हीच्या उपचारांमध्ये वापर करण्यात येत असलेल्या अॅन्टी-वायरल कॉकटेलपासून तयार करण्यात आले आहे. तसेच यामध्ये अँटी फ्लू आणि अँटी एचआय औषधांचा वापर केला गेला. हे औषध तयार करण्यासाठी ओस्टेल्टामिविर, लोपिनवीर आणि रटनवीर या औषधांचा वापर करण्यात आला आहे.
दरम्यान, चीन मध्ये प्रादुर्भाव झालेल्या कोरोना या नव्या विषाणुजन्य आजाराच्या प्रसाराचा सर्वात जास्त धोका असलेल्या ज्या तीस देशांची यादी प्रसारीत करण्यात आली आहे त्यात भारताचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटन मधील साऊदम्पटन विद्यापीठाच्या संशोधकांनी व्यापक अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. या यादीत सर्वाधिक धोका असलेल्या देशांत पहिल्या स्थानावर हॉंगकॉंग, दुसऱ्या स्थानावर जपान, तिसऱ्या स्थानावर हॉंगकॉंग हे देश आहेत. अमेरिका सहाव्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया दहाव्या, ब्रिटन सतराव्या, आणि भारत 23 व्या स्थानावर आहे.
काय काळजी घ्याल
- भरपूर प्रमाणात पाणी प्या
2) मांसाहार टाळा.
3) व्हिटॅमिन सी युक्त फळे खा ( आवळा, लिंबू, मोसंबी, संत्री)
4) तुळसी, आले, वेलदोडे यांचा चहामध्ये वापर करा.
5) पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश करा.
6) बाहेरुन आल्यावर हात पाय स्वच्छ धुवावेत. शिंकताना व खोकताना नाका-तोंडावर हातरुमाल धरावा. आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शिळे अन्न खाणे टाळावे, सकस व ताजे अन्न घ्यावे. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. तसेच मांसाहर करू नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
7) प्रतिकारशक्ती वाढवा