Mayawati On Loksabha। लोकसभा निवडणुकीच्या तारखा जस जशा जवळ येत आहेत. तस तशी विरोधी पक्षांची युती तुटताना दिसतीय. बहुजन समाज पक्षाला आपल्या गोटात आणण्यासाठी अनेक नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याबाबत बसपच्या सुप्रीमो मायावती यांनी पुन्हा एकदा पक्षाची भूमिका स्पष्ट केलीय.
बसपा प्रमुख मायावती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत पक्षाची भूमिका मांडली. यात त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती न करण्याचे बसपने वारंवार स्पष्ट करूनही, दररोज युतीबाबत अफवा पसरवणे हे सिद्ध करते की, बसपाशिवाय काही पक्षांना चांगली संधी मिळणार नाही. तर बसपाला आपल्या लोकांचे कल्याण सर्वात महत्त्वाचे आहे.” असे म्हटले.
लोकांनी अफवांपासून सावध राहावे Mayawati On Loksabha।
त्यामुळे संपूर्ण समाजाचे, विशेषत: गरीब, शोषित आणि उपेक्षितांचे हित आणि कल्याण लक्षात घेऊन, तन, मनाने स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याचा बसपचा निर्णय आहे, असे मायावती यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. देशभरातील जनतेचा निर्णय पक्का आहे. लोकांनी अफवांपासून सावध राहावे.असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
1. आगामी लोकसभा आमचुनाव बीएसपी द्वारा किसी भी पार्टी से गठबंधन नहीं करने की बार-बार स्पष्ट घोषणा के बावजूद आएदिन गठबंधन सम्बंधी अफवाह फैलाना यह साबित करता है कि बीएसपी के बिना कुछ पार्टियों की यहाँ सही से दाल गलने वाली नहीं है, जबकि बीएसपी को अपने लोगों का हित सर्वोपरि है।
— Mayawati (@Mayawati) February 19, 2024
गेल्या महिन्यात मायावती यांनी आपला पक्ष आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांनी निवडणुकीनंतरची युती नाकारली नाही. आपल्या 68 व्या वाढदिवसानिमित्त मायावती म्हणाल्या की मी राजकारणातून संन्यास घेत नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत राहीन यावर भर दिला.
मायावतींनी आपल्या पक्षाच्या लोकांना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यापासून सावध राहण्यास सांगितले होते. अखिलेश यादव यांनी गिरगिटासारखे रंग बदलले आहेत, असे मायावती म्हणाल्या होत्या. जातीयवादी, भांडवलशाही आणि जातीयवादी विचार असलेल्या सर्व पक्षांपासून बसपा अंतर राखेल, असे मायावतींनी स्पष्ट केले.