लखनऊ : उत्तर प्रदेशमधील बहराईच भागात वडिलांवर वडिलांवर बिबट्याने हल्ला करून 6 वर्षांच्या मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. ३) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील बहराईच भागात लाईट गेल्यामुळे रात्रीच्या वेळी घराच्या अंगणात वडील मुलीसोबत खेळत होते यावेळी अंधारात बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला आणि वेगाने पसार झाला. त्यानंतर रात्रीच्या अंधारात वडिलांना ठिकठिकाणी शोधण्याचा पर्यन्त केला मात्र वडील तिला शोधू शकले नाही. आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे ग्रामस्थ गोळा झाले आणि त्यांनी मुलीचा शोध सुरू केला. यानंतर त्यांनी या घटनेची सविस्तर माहिती वनविभागास सांगितली. वनविभागाने शोध सुरू करून वेगवेगळ्या टीम नेमल्या आणि मुलीचा शोध सुरू केला.
शोध मोहिमे दरम्यान, दुसऱ्या दिवशी गावापासून 300 मीटर अंतरावर मुलीच्या शरीराचे काही अवशेष मिळाले. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. तर गावकऱ्यांनी बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.