Yogi Adityanath । Lok Sabha Election 2024 – एकेकाळी दहशतीच्या जोरावर मतदान केंद्रातून मतपेट्या पळवणारे पक्ष आता ईव्हीएमच्या विश्वासाहर्तेबद्दल बोलत आहेत. जेव्हा जेव्हा काँग्रेस, सपा किंवा इंडिया आघाडीशी संबंधित इतर पक्ष निवडणुका हरतात तेव्हा ते पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडण्याचा प्रयत्न करतात, असे आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहेत.
२०१४ पासून तुम्ही हे सतत ऐकत आहात. गेल्या वर्षी हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात काँग्रेसने सरकार स्थापन केले. ते मतदान बॅलेट पेपरचे होते का? २००९ मध्ये केंद्रात यूपीए सरकार स्थापन झाले. त्यावेळची मतपत्रिकाही कागदाची होती का?
एकच लक्षात घ्या की, काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज जे ईव्हीएम नाकारत आहेत तेच लोक मतपत्रिकांची लूट करायचे, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले. । Yogi Adityanath
ईव्हीएमशी संबंधित वादावर सुप्रीम कोर्टाने आपला निकाल देत बॅलेट पेपरद्वारे निवडणुका होणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे विरोधक बिथरले आहेत,तासेही योगी म्हणाले. । Yogi Adityanath । Lok Sabha Election 2024