मुंबई – राज्यात काही दिवसांपासून हवामानामध्ये प्रचंड बदल होताना दिसत आहे. राज्यासह देशात एकीकडे कडक ऊन, तर दुसरीकडे काही भागात पावसाचे वातवरण आहे. त्यातच राज्यात पुढील तीन दिवस काही ठिकाणी पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही ठिकाणी अतिष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये पावसाने आज झोडपले तर मराठवाड्यामध्ये काही भागात पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेची लाट आल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्यात एकाचवेळी दोन वेगवेगळ्या प्रकारचे हवामान झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा Weather Update|
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर कोकण, ठाणे, मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी पुणे, नगर, हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसह राज्यात अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. वीज कोसळून जनावरांचा मृत्यूही झाला आहे.
हेही वाचा:
जामखेड तालुक्याला अवकाळीचा तडाखा; वीज कोसळून चार जनावरांचा मृत्यू
वाघोलीत धुंवाधार पाऊस! झाडपडी, फ्लेक्स होर्डिंग कोसळले; महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी