Sanjay Raut On PM Modi| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. 45 वर्षांपूर्वी येथील एका नेत्याने या खेळाला सुरवात केली. तेव्हापासून राजकीय अस्थिरतेचा खेळ सुरू झाला, अशी टीका शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले संजय राऊत? Sanjay Raut On PM Modi|
संजय राऊत म्हणाले की, “मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे. हा आत्मा महाराष्ट्रात भटकत आहे. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. जे मराठी माणसाचे शत्रू आहेत, असे अनेक आत्मे महाराष्ट्रात साडेचारशे वर्षांपासून भटकत आहेत. ज्यांना महाराष्ट्राने गाडले असे सगळे आत्मे भटकत आहेत. हा नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय. पण भाजपाचा अंतिम संस्कार महाराष्ट्रातच होईल. या भुताटकीच्या वक्तव्यांना महाराष्ट्र जुमानत नाही. महाराष्ट्राने अंधश्रद्धा फेकाफेकी यांना कधीही महत्त्व दिलं नाही.”
“महाराष्ट्र पवित्र आत्म्यांचा प्रदेश आहे. काल मोदी पुण्यात होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख तरी त्यांनी केला का? आंबेडकरांवरती भाजपला राग आहे. संविधान त्यांना बदलायचे आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले आंबेडकरांचे संविधान त्यांना बदलायचे आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.
“मराठी आणि महाराष्ट्राचे नुकसान मोदींनी केलं तेवढं कोणीही केलं नाही. या अतृप्त आत्म्यांविरोधात महाराष्ट्राची लढाई आहे. मोदी माझ्याविषयी बोलले मला माहिती आहे. जर तुमच्यासारखा एकच पंतप्रधान बसला तर या राज्याची भुताटकी होऊन जाईल. आमच्याकडे पंतप्रधान पदाचे एकापेक्षा जास्त चेहरे आहेत. हे लोकशाहीचे उत्तम उदाहरण आहे. आम्ही पंतप्रधान लादणार नाही लोक जे स्वीकारतील तो प्रधानमंत्री होईल, “असे टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी? Sanjay Raut On PM Modi|
पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “काही स्वप्न अधुरी राहिले की आत्मा भटकता राहतो. महाराष्ट्र हे भटक्या आत्म्याचा शिकार झालेले आहे. 45 वर्षांपूर्वी येथील एका नेत्याने या खेळाला सुरवात केली. तेव्हापासून राजकीय अस्थिरतेचा खेळ सुरू झाला. हा अतृप्त आत्मा 1995 मध्ये शिवसेना-भाजपाचं सरकार अस्थिर करु पाहत होता. 2019 साली अतृप्त आत्म्याने काय केले हे राज्याने पहिले आहे. आता देश अस्थिर करण्याचा प्रयत्न या आत्म्याने सुरु केला आहे. ते केवळ विरोधकांना अस्वस्थ करत नाही, ही आत्मा कुटुंबाला देखील सोडत नाही,” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली होती.
हेही वाचा:
“हा माणूस काय वेडा झाला आहे का? ” ; चंद्रकांत खैरेंचा व्हिडिओ दाखवत शिंदे गटाच्या नेत्याची टीका