Pm Modi in Dharashiv । देशातील लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा ७ मी रोजी पार पडणार आहे. त्यासाठी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. काल दिवसभरात ३ सभा घेतल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरस याठिकाणी सभा घेत आहेत. याठिकाणी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा सुरु आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला
सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाची माहिती दिली. सुरुवातील त्यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होतो असे म्हटले. आजपर्यंत जग ज्या ठिकाणी पोहोचू शकला नाही त्या अंतराळ क्षेत्रात मोठी झेप भारत चंद्रावर पोहचला. तसेच युक्रेन युद्धातून भारतीयांना आम्ही सुखरूप परत आणले असे मोदींनी म्हटले. कोरोनामध्ये भारताने स्वतःची लास बनवले
“काँग्रेसचा पंजा निधी हिसकावण्याचा” Pm Modi in Dharashiv ।
पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली. मागच्या ६० वर्षात काँग्रेसने जगाकडे मदत मागितली. पण आजचा भारत जगाकडे भीक मागत नाही तर जगाला मदत करतो असे त्यांनी म्हटले. तसेच काँग्रेसची एकच ओळख ती म्हणजे विश्वासघात असल्याचे म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ६० वर्षात पाण्यासाठी काँग्रेसने जे केलं नाही ते १० वर्षात मोदीने केले. पुढे त्यांनी “काँग्रेसचा पंजा निधी हिसकावण्याचा” आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांच्या वाट्याचे पैसे काँग्रेसच्या नेत्यांच्या खात्यात जात होते. पण मोदी सरकारने पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात पोहचवले आहे. तसेच सोयाबीन उत्पादकांना काँग्रेसपेक्षा जास्त पैसे आम्ही दिले. असे त्यांनी सांगितले.
‘मोहब्बत कि दुकान’मध्ये फेक व्हिडीओ दाखवले जातात Pm Modi in Dharashiv ।
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला. मोदी समस्या टाळत नाही तर मी समस्यांशी लढतो” असे म्हटले. तसेच मी तुमचे जीवन बदलण्यासाठी दिवस-रात्र एक करतोय तर हे इंडिया आघाडीवाले मला बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच विरोधक माझा वाईट प्रचार करत आहेत, ‘मोहब्बत कि दुकान’मध्ये फेक व्हिडीओ दाखवले जात आहेत. काँग्रेसची नजर ही तुमच्या मेहनतीच्या कमाई वर असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
नकली शिवसेना, राष्ट्रवादीने राममंदिराचे निर्माण नाकारले
दरम्यान, मोदींनी यावेळी प्रभू श्रीराम यांच्या मंदिरावर भाष्य केले .काँग्रेसच्या काळात या मंदिराचे निर्माण रोखण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला. तर मोदी सरकारने प्रभू रामाचे मंदिर निर्माण केले असे म्हटले. तसेच राज्यातील नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने राममंदिराचे निर्माण नाकारले, असे पाप त्यांनी केल्याचा आरोप मोदींनी केला. दरम्यान अर्चना पाटील याना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली.