नवी दिल्ली :- गेल्या नऊ वर्षांत सरकारने केलेल्या कामांमुळे भारतातील रस्त्यांचे जाळे 59 टक्क्यांनी वाढले आहे आणि भारताचे रस्त्यांचे जाळे अमेरिकेनंतर जगात दुसऱ्या क्रमांकाचे झाले आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
2013-14 मध्ये रस्त्याचे जाळे 91,287 किमी इतके होते. त्या तुलनेत आज हे रस्त्यांचे जाळे 1,45,240 किमी इतके झाले आहे असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. ते आज दिल्लीत ‘सरकारची 9 वर्षांची उपलब्धी’ या विषयावर आयोजित परिषदेत बोलत होते.
गेल्या नऊ वर्षांत भारताने या क्षेत्रात सात जागतिक विक्रम केले. भारताचे रस्त्यांचे जाळे अमेरिकेनंतर जगात दुसऱ्या क्रमांकाचे झाले आहे, असे ते म्हणाले.
टोलमधून मिळणारा महसूल 2013-14 मध्ये 4,770 कोटी रुपयांवरून 4,1342 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.फास्टॅगच्या वापरामुळे टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ 47 सेकंदांपर्यंत कमी करण्यात मदत झाली आहे असा दावाही त्यांनी केला.