Abhishek Banerjee । लोकसभा निवडणूकीतील २ टप्पे आता पूर्ण झाले असून येत्या ७ मे रोजी तिसरा टप्पा पूर्ण होणार आहे. त्यातच काही राज्यातील निवडणुका रंजक होणार आहेत. त्यातच पश्चिम बंगालमधील यावेळचा निवडणुका अटीतटीची होणार असल्याचे म्हटले हात आहे. असे असताना आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी,”हिंमत असेल तर अमित शाहांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी, जर या निवडणुकीत माझा पराभव झाला, तर मी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेईन, असं आव्हानदिले आहे.
…तर मी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेईल Abhishek Banerjee ।
पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातील एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं. यावेळी बोलताना त्यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीकाही केली. “जर भाजपाला वाटत असेल की मी सक्रीय राजकारणातून निवृत्त्व व्हावं, तर भाजपापुढे तीन पर्याय आहे. पहिला पर्याय म्हणजे त्यांनी पश्चिम बंगालचे जीएसटीचे पैसे परत करावे, मी २४ तासांत राजकारणातून निवृत्ती घेईन, दुसरा पर्याय त्यांनी पंतप्रधान आवास योजनेचा थकीत निधी द्यावा, मी लगेच निवृत्ती घेईन आणि तिसरा पर्याय म्हणजे अमित शाह यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, माझा जर पराभव झाला, तर मी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेईल”, अशी प्रतिक्रिया अभिषेक बॅनर्जी यांनी दिली.
“शाहांकडून नैतिक मुल्ये शिकण्याची गरज नाही”
पुढे बोलतानाअभिषेक बॅनर्जी यांनी, “अमित शाह हे कधीच कोणत्या आंदोलनात सहभागी झाले नाही. त्यांना गुजरातमध्ये तडीपार करण्यात आले होते. ते तुरंगातही जाऊन आले आहेत. त्यांच्याकडून आम्हाला नैतिक मुल्ये आणि विचारधारा शिकण्याची गरज नाही”, अशी टीकाही केली.
“सगळेच अमित शाहांसारखे नसतात” Abhishek Banerjee ।
दरम्यान, पश्चिम बंगालमधील एका सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांना त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली होती. या टीकेला अभिषेक बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिले. “काहीही संबंध नसताना अमित शाह यांनी त्यांच्या मुलाला बीसीसीआयचे सचिव बनवले आहे, त्यामुळे सगळेच अमित शाहांसारखे नसतात”, असा टोलाही त्यांनी लगावला.