नवी दिल्ली – भारतात कोरोनाचा प्रसार सतत वाढत असल्यामुळे भारतात समुह संसर्ग होण्याची शक्यता आहे. तर भारताने समुहसंसर्गासाठी तयार रहा, असा इशारा पब्लिक हेल्थ फाऊंडेशन इंडियाचे अध्यक्ष प्रोफेसर के. श्रीनाथ रेड्डी यांनी दिला आहे.
भारतात सध्या अनेक राज्यांमध्ये रोजचा आकडा धक्कादायक आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याच बरोबर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.
देशात समूह संसर्ग सुरू झालाय असं मानूनच देशानं यासाठी योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे. समूह संसर्ग ही शक्यता नाही तर खराखुरा धोका आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, देशातील काही भागांत कोणताही प्रवास न करणाऱ्या आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात न आलेले काही जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे इथून पुढच्या काळात अधिक काळजी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.