चेन्नई – भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी मुंबईचा नवोदित खेळाडू सूर्यकुमार यादवला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
भारत व इंग्लंड संघांत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर पाचे टी-20 व तीन एकदिवसीय लढती खेळवण्यात येणार आहेत. 12 मार्चपासून अहमदाबाद येथे टी-20 मालिकेला प्रारंभ होणार आहे.
बुमराहने गेल्या काही काळात सातत्याने भारताच्या तिन्ही संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे त्याच्यावरील ताण हलका करण्यासाठी मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
तसेच ऋषभ पंतचे संघातील पुनरागमन निश्चित मानले जात असून सूर्यकुमारलाही यंदा पदार्पणाची संधी मिळू शकते. सर्व टी-20 सामने अहमदाबादला खेळवण्यात येणार आहेत.