विशाखापट्टणम – पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारलेल्या भारतीय संघाला आजपासून येथे सुरु होत असलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याची संधी आहे. पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दुसर्या डावात नांगी टाकल्याने पराभवाचा सामना करावा लागला होता.
लक्षवेधी
– राहुल व जडेजाची उणिव भासणार
– कोहलीही विश्रांतीवर असल्याने फलंदाजी कमकुवत
– जेम्स अंडरसन संघात परतणार
– वुड व हार्टलीची गोलंदाजीही निर्णायक ठरेल
– कर्णधार रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा
– मधल्या फळीत सर्फराज खान व अय्यरवर मदार
कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर व यष्टीरक्षक केएस भरत यांना साफ अपयश आले. फलंदाजीत बळकटी येण्यासाठी देशांरतर्गत स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा मुंबईचा सर्फराज खान याचा संघात समावेश करण्यात आला आहे. या दुसर्या कसोटीत अनुभवी लोकेश राहुल व रवींद्र जडेजा दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याने यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल व सर्फराज खानचा संघात समावेश करण्यात आला आहे.
गोलंदाजीत जसप्रीत बुमराहच्या जोडीला महंमद सिराज असला तरीही येथील खेळपट्टी पाहता संघात तिसरा वेगवान गोलंदाजम्हणून सौरभ कुमार किंवा मुकेश कुमार यांच्यापैकी एकाला संघात निश्चित स्थान मिळेल. दोन फिरकी गोलंदांमध्ये रवीचंद्रन अश्विनसह कुलदीप यादव यालाही संधी मिळू शकते. जडेजा नसल्याने कुलदीपचे स्थानही निश्चित मानले जात आहे. जर तिन फिरकी गोलंदाज खेळवण्यावरच रोहित ठाम राहिला तर अक्सर पटेल व वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाला स्थान मिळेल.
इंग्लंडची फलंदाजी भारतापेक्षा तुलनेने कमकुवत असली तरीही त्यांच्या गोलंदाजांनी त्यांचे काम सोपे केल्याने ते पहिला कसोटी सामना अत्यंत अविश्वसनियरीत्या जिंकू शकले. टॉम हार्टले व ओली पोप यांच्यासमोर भारताचा दुसरा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला व त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या कसोटीतून बोध घेत भारतीय फलंदाज आता आपल्या तंत्रात बदल करुन जबाबदारीने खेळ करतील अशी अपेक्षा आहे.
पहिल्या कसोटीत ओली पोपने फलंदाजीत तर गोलंदाजीत हार्टलीने अफलातून कामगिरी केली होती. आता त्यांना रोखण्याची महत्वाची जबाबदारी भारताच्या गोलंदाजांना पार पाडावी लागणार आहे. तसेच त्यांचा कर्णधार बेन स्टोक्स यांच्यासह जॅक क्राऊली, बेन डकेट, ज्यो रूट, जॉनी बेअरस्टो या त्यांच्या फलंदाजांचे दडपण भारतीय गोलंदाजांना झुगारणे जमले तर भारतीय संघ या कसोटीत विजय मिळवत मालिकेत बरोबरी करण्याची अपेक्षा करता येइल.
गिल रडारवर…
मर्यादीत षटकांच्या सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी केलेला शुभमन गिल पहिल्या कसोटीत दोन्ही डावात अपयशी ठरला. त्यापूर्वीही त्याला कसोटी स्तरावर म्हणावे तसे यश मिळालेले नाही. त्यामुळे या कसोटीत त्याला संधी मिळाली तर ही त्याच्यासाठी नशीबाची गोष्ट ठरेल व कदाचित तो यशस्वी ठरला तरच त्याला या संपूर्ण मालिकेत संघात ठेवले जाणार आहे. अन्यथा त्याची जागा घेण्यासाठी अनेक पर्याय सर्फराज खानप्रमाणे समोर आले आहेत.
बॅजबॉलचेही दडपण राहणार…
महत्वाचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले तरीही आक्रमक फलंदाजी सुरु ठेवायची हेच सुत्र म्हणून बॅजबॉल आज सर्व प्रचलित झाले आहे. पहिल्या कसोटीत पहिल्या डावात दोन्ही संघांना यात अपयश आले मात्र, दुसर्या डावात इंग्लंडने ते सार्थ ठरवले. आता या कसोटीतही हेच बॅजबॉल सुत्र भारताने यशस्वी केले पाहीजे. मात्र, इंग्लंडची फलंदाजी सुरु असताना त्याचेच दडपण भारतीय संघासमोर राहणार आहे.