मुंबई – कोरोना संकटाचा सामना करत असतानाच राज्याच्या अर्थचक्राला चालना देणेही महत्वाचे असल्याने राज्यामध्ये ३० जूनपासून “मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. असं असलं तरी कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यातील लॉक डाऊन ३१ जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. ठाकरे सरकारने याबाबतची घोषणा केल्याने आता ३० जूननंतर देखील सध्या असलेले निर्बंध कायम राहतील.
यासोबतच कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना स्थानिक परिसरात निर्बंध लागू करण्याचे सर्वाधिकार राज्य सरकारतर्फे देण्यात आलेत. करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसंच लोकांच्या हालचालींवर प्रतिबंध आणण्याचे अधिकारही सुपूर्द करत असल्याचे राज्य सरकारने म्हंटले आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आल्यानंतर देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्रातील मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांपासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. याच पार्श्वभूमीवर, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अधिक करोना रुग्ण असलेल्या मुंबईसह एमएमआर परिसरासह पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक,धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर महापालिका परिसरात अधिक निर्बंध असणार आहेत.
Concerned District Collector and Commissioners of the Municipal Corporations in the state may enforce certain measures and necessary restrictions in specified local areas on the permitted non-essential activities and movement of persons to control #COVID19: Maharashtra Government https://t.co/6QPs5GPtCY
— ANI (@ANI) June 29, 2020