हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : जमिनीतून अचानकपणे धूर निघून त्या ठिकाणचे दगड पूर्णपणे काळे पडण्याचा धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा याठिकाणी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी जमिनीतून दूर निघत असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत महावितरणचे अधिकारी देखील उपस्थित होते.त्यासोबतच तहसील कार्यालयाकडून खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा या ठिकाणी जमीनीतून धूर येण्याच्या प्रकाराने परिसरातील नागरिक घाबरले आहेत .या ठिकाणी महसूल प्रशासनाच्या वतीने100 मीटर पर्यंतच्या परिसरात कोणीही जाऊ नये असे आदेश महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथील जमीन अचानक गरम होत असून या ठिकाणावरून धूर निघत आहे. हा धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी जाऊन पाहणी केली. जमिनीमधून धूर निघत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी असलेला विजेचा पुल देखील कोसळून पडला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मणनाईक तांडा येथे गावातील गट क्रमांक 56 मध्ये जोगराम राठोड यांच्या मालकीच्या जमिनीतून मागील काही दिवसांपासून उष्ण धूर निघत आहे. जमिनीतून धूर निघत असल्यामुळे गावकऱ्यांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराची माहिती सरपंच ज्योती रवींद्र पवार यांनी तहसील प्रशासनाला दिली होती. त्यानंतर गुरुवारी स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाचे डॉ. कदम यांच्या पथकाने या भागात पाहणी केली. त्यानंतर आज तहसीलदार हिमालय घोरपडे, भुजल सर्व्हेक्षण विभागाचे अधिकारी रवींद्र मांजरमकर, वैजनाथभालेराव, रवींद्र पवार, पोलिस पाटील संदीप पवार, तलाठी एम. एफ. फोफसे, मंडळ अधिकारी सुरेश बोबडे, महावितरणचे सहाय्यक अभियंता अश्विन कुमार मेश्राम, नितीश कुलकर्णी यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या पथकाने घटनास्थळावरून काही दगडांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. या.शिवाय सदर प्रकार नेमका कशामुळे होत आहे, याची माहिती होईपर्यंत.घटनास्थळाच्या 100 मीटर परिसराच्या आत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या बाबतचे फलक ग्रामपंचायत कार्यालयासमोर लावण्यात आले आहेत.