देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांना विनंती
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 15 दिवसांच्या वर झाले आहे. मात्र कोणत्याही पक्षाला स्थिर सरकार देता आले नाही. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागु झाली आहे. दरम्यान, या राष्ट्रपती राजवटीच्या कार्यकाळात राज्यातील बळीराजाचे नुकसान होवू नये, यासाठी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मा. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारीजी यांची आज सकाळी राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी केली. लगेच कारवाई करण्याचे मा. राज्यपाल महोदयांनी मान्य केले आहे. pic.twitter.com/lM8TVFHSmy
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 15, 2019
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची आज सकाळी राजभवनात जावून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी यावेळी फडणवीय यांनी केली. दरम्यान, त्यांच्या मागणीचा विचार करू तसेच लगेच कारवाई करण्याचे आश्वासनदेखील यावेळी राज्यपाल महोदयांनी मान्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावे. पण एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, अशी विनंती केली. मा. राज्यपाल महोदयांनी यावर सुद्धा तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 15, 2019
मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावे. पण एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, अशी विनंती केली. राज्यपाल महोदयांनी यावर सुद्धा तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले.