मुंबई – राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. तर, आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अश्यातच, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केलं आहे. “उशिरा का होईना राज्यपाल यांचा राजीनामा मंजूर झाला आहे’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “नवे येणारे रमेश बैस यांच्या सोबत दहा वर्षे काम केले असून राज्यपाल पदी रुजू झाल्यास त्यांची भेट घेणार आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्या विषयी पडदा टाकूयात असेही सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.
नवे येणारे राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत दहा वर्षे काम केलं असून राज्यपाल पदी रुजू झाल्यास त्यांची भेटणार आहे. तसेच, राजकीय विषय बाजूला ठेवा पण महापुरुषांच्या बद्दल केलेले भाष्य अतिशय दुर्दवी आहे. त्यामुळे उशिरा का होईना भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर झाला आहे.’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून संपूर्ण राज्यात राज्यपाल हटाव मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यावरून ठिकठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली होती.