PM Modi in Nandurbar। देशभरात निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. आता लोकांच्या नजरा चौथ्या टप्प्याच्या मतदानाकडे लागल्या आहेत. 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात 10 राज्यांमधील लोकसभेच्या 96 जागांवर मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी राजकीय पक्षांनी आता या 96 जागांवर आपला प्रचार तीव्र केला आहे. याआधी तिसऱ्या टप्प्यात देशातील 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांवर मतदान झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील काही मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.
मोदी जिवंत असेपर्यंत कोणत्याही… PM Modi in Nandurbar।
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील नंदुरबारमध्ये आयोजित सभेला संबोधित केले. यावेळी मोदींनी देशातील आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठे भाष्य केले. सभेदरम्यान, मोदींनी ‘मोदी जिवंत असेपर्यंत कोणत्याही धर्माला एससी-एसटी-ओबीसीचे मी आरक्षण देऊ देणार नाही,’ असे म्हटले होते. तसेच , ‘मी अत्यंत जबाबदारीने सांगत आहे कि मोदी हे वंचितांच्या हक्काचे चौकीदार आहेत.” असे म्हणत त्यांनी उपस्थितांना विश्वास दिला.
पुढे पीएम मोदी म्हणाले, ‘आरक्षणाबाबत काँग्रेसची अवस्था अतिशय गोंधळ निर्माण करणारी आहे. धर्माच्या आधारे आरक्षण हे बाबासाहेबांच्या आणि संविधानाच्या विरुद्ध आहे. पण दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचे आरक्षण हिसकावून त्यांच्या व्होटबँकेला द्यायचा हा काँग्रेसचा अजेंडा आहे.असा आरोप त्यांनी यावेळी केला.
काँग्रेस विकासात मोदींशी स्पर्धा करू शकत नाही PM Modi in Nandurbar।
विकासात मोदींशी स्पर्धा करू शकत नाही हे काँग्रेसला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीत खोट्याचा कारखाना उघडला असून खोटेपणा पसरवून मते मिळवायची आहेत. कधी आरक्षणाबाबत खोटे बोलतात, तर कधी संविधानाबद्दल खोटे बोलतात. एकही गरीब कुपोषणाला बळी पडू नये याची आम्हाला काळजी होती. आज नंदुरबारमधील १२ लाखांहून अधिक लोकांना मोफत रेशन मिळत आहे. एका बाजूला भाजपचे प्रयत्न आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. काँग्रेसने आदिवासी बांधवांची कधीच पर्वा केली नाही. आदिवासी भागात सिकलसेल ॲनिमिया हा मोठा धोका आहे, पण काँग्रेसने या आजाराकडे फारसे लक्ष दिले नाही.