नगर – आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. मातंग समाजाच्या विविध प्रलंबीत मागण्यांकडे राज्य सरकारने लक्ष देऊन, पुर्ण करावे अशी, मागणी करण्यात आली. अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट, शहर संपर्क प्रमुख संतोष उमाप व कामगार संघटनेचे अनिकेत आरोळे यांच्या हस्ते लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी संजय लोखंडे, सुनिल पठारे, अशोक भोसले, लखन लोखंडे, नामदेव अडागळे, गणेश अडागळे, महेश भोसले, प्रकाश साबळे, मंगेश गायकवाड आदी उपस्थित होते.
सुनिल सकट यांनी अनेक वेळा आंदोलन करुनही अद्यापि मातंग समाजाला न्याय मिळालेला नाही. राज्य सरकारकडे अनुसूचित जातीमध्ये अ,ब,क व ड नुसार वर्गवारी करुन मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्रय आरक्षण मिळावे.
आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद यांच्या संगमवाडी येथील समाधी स्थळी स्मारकाचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे, राज्य व केंद्र सरकारच्या अनुसूचित जातीकरिता असलेल्या सर्व योजनांची बिहार राज्याप्रमाणे अ,ब,क,ड नुसार वर्गवारी करण्याची मागणी प्रलंबीत आहे. या मागण्या तातडीने सोडवून मातंग समाजाला प्रवाहात आनण्याचे काम सरकारने करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संतोष उमाप म्हणाले की, लहुजी वस्ताद साळवे अनेक क्रांतीकारक घडविले. लहुजींचा इतिहास अंधारात ठेवण्यात आला असून, त्याला खर्या अर्थाने जगापुढे मांडण्याची गरज आहे. स्वातंत्र्याच्या क्रांतीचे महानायक म्हणून त्यांची प्रतिमा असून, युवकांनी त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन त्यांनी केले.