-डॉ. दिलीप येळगावकर व अनिल देसाई यांचे आवाहन, माणच्या संस्कृतीला गोरेंनी काळिमा फासला
हनिमून करणारी ही अपप्रवृत्ती : देसाई
साखरपुडा न करताच गोरेंनी नक्की कुणाशी हनिमून केले, असा सवाल करून अनिल देसाई म्हणाले, अशी प्रवृत्ती काय असेल याचा विचार करा. लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून गोरेंचे कारनामे सांगणार आहोत, पाणी प्रश्नावर मतदारसंघात यांनी केवळ चमकोगिरी केली त्यामुळे माणच्या मतदारसंघातून गोरे यांना हटवण्याची मोहिम हाती घेतली आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी म्हणून घ्यायला यांना लाज वाटायला हवी, नाही तरी त्यांची राजकीय आत्महत्या ठरलेली आहे. थेट हनिमून करणारी अपप्रवृत्ती माण तालुक्याला परवडणारी नाही, असा टोला देसाई यांनी गोरे यांना लगावला.
सातारा – माण- खटाव मतदारसंघाचा महाराष्ट्रात वेगळा दबदबा आहे. त्या मतदारसंघात जयकुमार गोरे नावाची विषवल्ली पसरली आहे. माणच्या संस्कृतीला या लोकप्रतिनिधींनी काळिमा फासला असून या विषवल्लीला हद्दपार करण्यासाठी माणची जनता आमच्यासमवेत आहे, असा घणाघात भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई उपस्थित होते.
यावेळी येळगावकर म्हणाले, ेमाण- खटावचे आमदार गोरे यांचे काम अन् बोलणे दोन्हीही घाणेरडे आहे. ही विषवल्ली रोखण्याची वेळ आली आहे. उद्योगधंदे माण तालुक्यात येण्यासाठी मोठी जोखीम त्यांनी घेतल्याचे सांगत असले तरी माणला आलेला सोलर प्रोजेक्ट कुणामुळे गेला हे त्यांनी जनतेला सांगावे. तसेच ते हनीमून झाल्याचे सांगत आहेत ते खरचं आहे. कारण त्याचे हनीमून कोणासोबत झाले हे पोलिसांनी याअगोदर जनतेसमोर आणले आहे.
बहुजन वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांना भेटून मग कॉंग्रेसच्या मेळाव्याला जायचे म्हणजे यांचा बाहेरख्यालीपणा नेहमीच समोर आला आहे. आमचा हनिमून झालाय, असे गोरे म्हणतात एका पक्षाला उद्देशून केलेले त्यांचे वक्तव्य अशोभनीय आहे. या महाशयांचा इतिहासही तितकाच घाणेरडा आहे. ज्या धोंडीराम वाघमारेंचा हात धरून हे राजकारणात आले, त्यांना तालुक्यात फिरावयाची यांनी मुष्किल केली. जाईन तेथे घाण करण्याची यांची प्रवृत्ती आहे.
कर्नाटक हद्दीवरून जी बनावट दारू महाराष्ट्रात येते त्याचे कनेक्शन तपासल्यास बऱ्याच गोष्टी प्रकर्षाने समोर येतील, असा खळबळजनक गौप्यस्फोट येळगावकर यांनी केला. माणच्या राजकारणात आमचा दोन्ही गोरे बंधूंना विरोध आहे. शेखर गोरे यांना आम्ही मदत केली होती. उमेदवारीचा फार आग्रह न करता त्यांनी आमची मदत करावी, अशी अपेक्षा येळगावकर यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही खासदारांचे काम केले नाही, अशी बडबड करणाऱ्या गोरेंनी मधली दलाली बंद करावी.
आमचे काम आमच्या पक्षश्रेष्ठींनी पाहिले आहे. माण मतदारसंघात भाजपच्या ज्या सभा झाल्या त्यांचे नियोजन देसाई व आम्हीच केले होते. जर गोरे यांची स्वतंत्रपणे निवडून येण्याची क्षमता असेल तर त्यांनी भाजपचे पाय चाटण्याची काय गरज आहे, अशी सडकून टीका येळगावकर यांनी केली. गोरे हे रोज एका पक्षाच्या दारात असतात. त्यामुळे ते कुणाकुणासोबत जातात हे कळत नसल्याने त्यांचा बाहेरख्यालीपणा समजण्यापलीकडचा आहे.
मायणीला पाणी नसल्याचे सांगता पण त्याआगोदर बोराटवाडीची काय अवस्था आहे ते पहा असा सल्ला येळगावकरांनी दिला. पाणी आणल्याचे सांगणारे आमदार सांगलीला जाणाऱ्या उरमोडीच्या पाण्याला थांबवण्यासाठी काय केले याचा खुलासा करावा. घाणेरडे बोलून जनतेची करमणूक करण्यापेक्षा आमदारांनी आत्मपरीक्षण करावे, असेही येळगावकर म्हणाले.