पाचगणी – जावळी तालुक्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे घोटेघर, सुलेवाडी येथील डोंगरास एक ते दीड किलोमीटर लांबीच्या तर दीड फूट रुंदीच्या चंद्रकोरीच्या आकाराच्या तीन टप्प्यात डोंगराला भेगा पडून भूस्खलन झाले आहे. दीड ते दोन हजार लोखंसंख्येच्या रांजणी गावास या भूस्खलनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
नामदेव गेनदेव रांजणे, रोहिदास गेनदेव रांजणे, रामदास गेनदेव रांजणे, शांताराम गेनदेव रांजणे, बळवंत सावळा रांजणे, भरत बाबुराव रांजणे, संतोष महादेव झाडे, सुरेश नारायण झाडे, जानू राघू झाडे, भारती चव्हाण रा. घोटेघर (सुलेवाडी) तर सुलेवाडी येथील पंधरा घरांना या भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.
यामध्ये नारायण रामचंद्र पडसरे, संतोष महादेव झाडे, तुकाराम लक्ष्मण पडसरे, सीताराम लक्ष्मण पडसरे, बाबू रामचंद्र पडसरे, दत्तू लक्ष्मण पडसरे, प्रकाश हरिभाऊ पडसरे, सुरेश दगडू पडसरे, आनंदा दगडू पडसरे, सहदेव नाना पडसरे, बळवंत भागोजी पडसरे, वसंत महादेव सावंत, आत्माराम लक्ष्मण पडसरे, महादेव राघू झाडे, सुरेश नारायण झाडे, कृष्णा भिकू पडसरे रघुनाथ कृष्णा पडसरे, बाबुराव रामचंद्र पडसरे, त्याच बरोबर डोंगरखाली असलेल्या व आधीच महू धरणात बाधित झालेल्या गावावर माळीणसारखे संकट ओढवणार असल्याची भीती व्यक्त हत आहे.