पुणे – महाराष्ट्रात लागू झालेल्या राष्ट्रपती शासनाला राज्यातील पक्ष आणि आमदार जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी स्वर्ण भारतच्यावतीने करण्यात आली असून याबाबत पार्टीच्यावतीने जनजागृती मोहीम सुद्धा राबविण्यात येणार आहे.
लोकशाही पद्धतीने राज्यात निवडणुका घेऊन मतदारांनी आपले आमदार निवडून दिले आहेत. या निवडणुका व्यवस्थित पार पडाव्यात म्हणून निवडणूक आयोगाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे.