लाखणगाव, (वार्ताहर) -आंबेगाव शिरूर तालुक्यातील अनेक गावांना वरदान ठरलेल्या हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण उजवा कालव्यास आवर्तन सोडावे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा कुकडी प्रकल्प कालवा, सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.
कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची रब्बी हंगाम आवर्तन नियोजनाची बैठक 20 ऑक्टोबर 2023 रोजी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकी मधील निर्णयास अनुसरून कुकडी प्रकल्पातील कालव्यांची रब्बी हंगाम आवर्तने पार पडली. या कालव्यांपैकी डिंभे उजवा कालवा आवर्तन दि. 19 डिसेंबर 2023 ते 18 जरनेवारी 2024 या दरम्यान पार पडला आहे; परंतु सद्यस्थितीत डिंभे उजवा कालवा आवर्तनास 1 महिना पूर्ण झाला असून उन्हाळी वातावरणामुळे रब्बी पिकांना पाण्याच्या पुढील आवतर्र्नाची अत्यंत गरज असून वेळेत पाणी न सोडल्यास शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे डिंभे उजवा कालव्यास तातडीने आवर्तन सोडणेबाबत अधीक्षक अभियंता, कुकडी सिंचन मंडळ, पुणे यांना आदेश व्हावेत.
डिंभा उजव्या कालव्यावर आंबेगाव व शिरूर तालुक्यातील 50 गावांतील शेतीपिके अवलंबून आहेत. या परिसरातील ऊस, कांदा, चारा पिके तरकारी पिके, पालेभाज्या सध्या सुकू लागले आहेत. शेततळी तसेच पाझर तलाव, तळी, ओढे, नाले कोरडे पडले आहेत. विहिरींचे पाणी पातळी खालावली आहे. त्याचप्रमाणे शेतकर्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा वापर काट कसरीने करणे गरजेचे आहे. शेतकर्यांनी पाण्याची योग्य नियोजन करून शेती पिके घेणे गरजेचे आहे. -दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री