Ajit Pawar – अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी केलेले एक विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे, आशाताई पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. याविषयी बोलताना आशाताई म्हणाल्या,“अजित पवार आजारी असून त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यामुळे ते मतदानासाठी येऊ शकले नाहीत. १९५७ सालापासून मी मतदान करतेय. पूर्वी सुरुवातीला काटेवाडीत काहीच नव्हतं. पण माझ्या सुनेमुळे काटेवाडीत भरपूर बदल झाले”, असे आशाताई पवार यांनी यावेळी म्हटले
अशात अजितदादा यांच्या आईंनी ही इच्छा व्यक्त करताच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. अशात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले,’आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येक आईला वाटतं. त्यात चूक काहीच नाही, आपला मुलगा पुढे जावा हे प्रत्येक आईला वाटतं. ते स्वाभाविक आहे. मातृत्वाच्या भावनेतून त्या बोलल्या असतील.’
दरम्यान, “अजित पवारांवर लोकांचं प्रेम आहे. पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की दादांनीच मुख्यमंत्री व्हावं. माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या देखतच (माझ्या हयातीत) मुलाने मुख्यमंत्री व्हावं. बारामती आपलीच आहे, लोकांचंही दादांवर प्रेम आहे, आता पाहुयात”, असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, आज राज्यभरात २३५३ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. यापैकी काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. त्याची नक्की आकडेवारी उपलब्ध नव्हती. पण २३५३ ग्रामपंचायतींमध्ये एकूण २०,५७२ जागा आहेत. या सर्व २३५३ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचीही थेट निवडणूक होत आहे. याशिवाय २०६८ ग्रामपंचायतींमधील रिक्त २९५० जागांसाठी पोटनिवडणूक आजच होणार आहे. रिक्त असलेल्या १३० सरपंचपदासाठीही पोटनिवडणूक होत आहे. नक्षलग्रस्त भाग वगळता राज्यातील अन्य ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी सोमवारी होईल. तर नक्षलग्रस्त भागांमध्ये मंगळवारी मतमोजणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.