मुंबई – विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. अशातच मुंबईत आज जनसुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे पक्षीय बलाबलमध्ये सध्या भाजपचेच पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे.
Maharashtra: Jan Surajya Shakti party leader and Shahuwadi (Kolhapur) MLA Vinay Kore has extended his support to Bharatiya Janata Party (BJP). He met Chief Minister Devendra Fadnavis yesterday. pic.twitter.com/Y4qDW76CQk
— ANI (@ANI) October 30, 2019
जनसुराज्य शक्ती पक्षाने अशोक सराटी यांना कोल्हापूरच्या चंदगड मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. तर शिवसेनेने संग्रामसिंह कुपेकर यांना उमेदवारी दिली. परंतु याच मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी शिवाजी पाटील यांनी अपक्ष उभे राहून बंडखोरी केली होती.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागा तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. यामुळे सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांना युती करणे भाग आहे. त्यात शिवसेना सत्तेमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे. तर भाजपने मात्र आमचं ठरलंय याला स्पष्ट नकार दिला आहे.