Supreme Court on Rahul Narvekar : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येझालेल्या बंडानंतर आता त्यांच्यातील फुटीच्या प्रकरणाची सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी प्रलंबित आहे. शिवसेनेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)चार महिन्यांपूर्वी विधानसभा अध्यक्षांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही कार्यवाही न झाल्यामुळे महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्षांना सुनावत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून (Rahul Narvekar) योग्य ती पावलं उचलण्यात न आल्यामुळे आज न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकरांना सुनावणी प्रलंबित ठेवल्यावरून खडेबोल सुनावले आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या झालेल्या सुनावणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांच्या याचिका एकत्रितच ऐकल्या जातील ह्याबाबत मा. न्यायालयाच्या मनात कुठलाही संदेह नाही.
सोबत मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत जोडत आहे. pic.twitter.com/4ALZvC6wA9
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 13, 2023
सुनावणी संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या,’हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीचं प्रकरण एकत्रित केलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला कोर्ट न्याय देईल”, असं सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्या पुढे म्हणाल्या “मी आयुष्यात पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढली आहे. मी कोर्टबाजीसाठी राजकारणात नाही आले. मी राजकारणात सर्वसामान्य माय-बाप जनतेची सेवा आणि चांगले धोरण आखण्यासाठी आले होते. मला वाटलं नव्हतं हा दिवस येईल. शेवटी ही सत्याची लढाई आहे. सत्यासाठी जे काही करावं लागेल ते करेन.’ असं म्हणत सुळे यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला.
सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) आज आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून विधानसभा अध्यक्षांसमोरील (Rahul Narvekar) सुनावणीत होणाऱ्या दिरंगाईबाबतच्या याचिकांवर सुनावणी झाली. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष सुनावणीसंदर्भातलं वेळापत्रक न्यायालयासमोर सादर करणार असल्याचं न्यायालयात सांगण्यात आल्यानंतर त्यावरून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना चांगलंच सुनावलं. दरम्यान, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) “कुणीतरी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना हे सांगायला हवं की ते सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलू शकत नाहीत. कोणत्या प्रकारचं वेळापत्रक ते न्यायालयाला सांगत आहेत. सुनावणीच्या वेळापत्रकाचा अर्थ सुनावणीत दिरंगाई करणे हा असू नये. नाहीतर त्यांची शंका बरोबर ठरेल”, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी विधानसभा अध्यक्षांची बाजू मांडणारे मेहता यांनी इतर पक्ष अध्यक्षांना अमुक प्रकारे सुनावणी घ्या असं सांगत आहेत, अशी तक्रार केली असता त्यावरूनही न्यायालयाने त्यांना झापले “मुद्दा तो नाहीचे. त्यांच्या कृतीतून त्यांनी असं दाखवायला हवं की ते हे प्रकरण गांभीर्यानं हाताळत आहेत. जून महिन्यापासून काय घडलंय? हा गोंधळ असता कामा नये. विधानसभा अध्यक्षांकडून योग्य प्रकारे सुनावणी घेतली जायला हवी. त्यांनी रोजच्या रोज ही सुनावणी घेऊन पूर्ण करायला हवी. आपण नोव्हेंबरनंतर सुनावणी घेऊ असं ते म्हणू शकत नाहीत”, अशा शब्दांत न्यायालयाने (Supreme Court)विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)यांना सुनावले आहे.
“आम्ही १४ जुलै २०२३ रोजी या प्रकरणात निकाल दिला होता आणि सप्टेंबरमध्येही आदेश दिले होते. पण त्यानंतरही जर काही कार्यवाही केली जात नसेल, तर आम्हाला नाईलाजाने हे म्हणाव लागेल की त्यांनी दोन महिन्यांत निर्णय घ्यावा. दहाव्या परिशिष्टानुसार काम करणाऱ्या लवादामध्ये काहीतरी गांभीर्य असायला हवं. अशा ठिकाणी चाललेल्या सुनावणीमध्ये गोंधळ असू नये. या प्रक्रियेमध्ये आपण विश्वास निर्माण करायला हवा”, असेही न्यायालयाने(Supreme Court) ठणकावले आहे.
दरम्यान, यासंदर्भात न्यायालयाने(Supreme Court) आता विधानसभा अध्यक्षांना अल्टिमेटम दिला आहे. “सोमवारपर्यंत जर विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचं वेळापत्रक जाहीर केलं नाही, तर आम्ही त्यांना वेळापत्रक ठरवून देऊ. कारण आमचे आदेश पाळले जात नाहीयेत. महाराष्ट्रातील निवडणुकांच्या आधी निर्णय घेतला जायला हवा”, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना ठणकावून सांगितले.