पिंपरी, (प्रतिनिधी) – रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने संस्थेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी त्यांच्या प्रतिमेला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
धम्मराज साळवे म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे, त्यांच्या कमवा व शिका या संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले. तेच विद्यार्थी आज मोठ्या पदावरती काम करत आहेत. भाऊरावांच्या रयत शिक्षण संस्थेचा आज वटवृक्ष झालेला आहे व आशिया खंडात आज सर्वात मोठी रयत शिक्षण संस्था नामांकित आहे.
रयत विद्यार्थी विचार मंच संस्था देखील कर्मवीरांच्या पाऊलावर पाऊल ठेवत काम करेल. गरीब. गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक न्याय हक्कासाठी काम करेल.
या वेळी प्रदेश महासचिव संतोष शिंदे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मयूर जगताप, पिंपरी चिंचवड प्रभारी योगेश कांबळे व इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.