मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. उद्याच्या उद्या बहुमत चाचणी व्हावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी थेट प्रक्षेपण करण्याचेही आदेश दिले आहेत. या निकालावर कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी समाधान व्यक्त करत उद्या भाजप पराभूत होणार त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आजच राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Prithviraj Chavan, Congress: Tomorrow, at 11 am, members to take oath and at 5pm Pro-tem Speaker to hold Floor Test in Maharashtra Assembly. All 3 parties (Congress-NCP-Shiv Sena) are satisfied with the Supreme Court order. Devendra Fadnavis should resign today. pic.twitter.com/6cNGAMJf3w
— ANI (@ANI) November 26, 2019
भाजपला सत्ता आणि पैशाचा माज आला होता. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिल्याने आता आम्हाला भाजपला पराभूत करण्यासाठी अवघे काही तास प्रतिक्षा करावी लागणार आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करा तसेच उद्या संध्याकाळीपाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथ विधी पूर्ण व्हावा. त्यानंतर तातडीने विधीमंडळाच्या पटलावर बहुमत चाचणी व्हावी. गुप्त मतदानाने होणार नाही, लाईव्ह टेलिकास्ट करा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, सत्य परेशान हो सकता हैं… लेकिन पराजित नाही, अशी प्रतिक्रिया निकालानंतर शिवसेना नेचते संजय राऊत यांनी दिली आहे. सत्यमेव जयते… असे ट्वीट राऊत यांनी केले आहे.