नगर – कर्नाटकात सत्ता आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याच्या कॉंग्रेसने केलेल्या घोषणेचा देशभर एकाच वेळी येत्या मंगळवारी (दि. 9) हनुमान चालीसा पठाण करून निषेध करण्यात येणार आहे, अशी माहिती बजरंग दलाचे महाराष्ट्र व गोव्याचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
र्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा कॉंग्रेसने जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यात बजरंग दलाची तुलना पीएफआयशी करण्यात आली असून, कर्नाटकमध्ये सत्ता आल्यास बजरंग दलावर बंदी घालणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याबाबत विश्व हिंदू परिषदेने आपली भूमिका स्पष्ट केली. बजरंग दलाचे राजेंद्र सोनवणे, मुकूल गंधे, कुणाल भंडारी आदी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, “कॉंग्रेसने विशिष्ट एका समाजाला खूश करण्यासाठी बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा केली असून, कॉंग्रेसची रावण रुपी लंका समाजच नष्ट करील. विशिष्ट एका समाजाच्या वोट बॅंकेवर राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहे. याचे भानही कॉंग्रेसला राहिलेले नाही.”