चंद्रपूर – महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात भूमिगत सांडपाण्याची टाकी साफ करताना तीन कंत्राटी कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे. हे कामगार वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होते. बल्लारपूर परिसरातील सास्ती-धोपटाळा भागात मंगळवारी झालेल्या या घटनेत आणखी दोघे बेशुद्ध पडले आहेत.
सकाळी नऊच्या सुमारास चार कामगार 10 फूट खोल टाकी साफ करण्यासाठी आत उतरले परंतु, बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने इतर काही कामगारांनी स्थानिकांना पाचारण करून त्यांचा शोध घेतला गेला.
त्यानंतर जेसीबी मशिनच्या मदतीने टाकीचा स्लॅब काढून टाकण्यात आला, त्यानंतर रामपूर ग्रामपंचायतीचा एक सफाई कर्मचारीही टाकीत उतरला, मात्र तोही काही क्षणात बेशुद्ध पडला. राजू जंजार्ला आणि सुभाष खंडाळकर या दोन कामगारांना मृत घोषित करण्यात आले.
आणखी एक कामगार, सुशील कोरडे, ज्याची प्रकृती गंभीर होती, त्याला नागपुरातील रुग्णालयात हलवण्यात आले, जेथे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले.