मुंबई – बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खान नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. त्याबरोबर ते सोशलवरही बेधडकपणे सामाजिक मुद्यांवर आपलं मत मांडतात. यातच ते पुन्हा एकदा एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे.
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये कबीरने मुघलांना कमी लेखणारे चित्रपट पाहणे हे अडचणीचे तसेच लज्जास्पद वाटते असं मत त्यांनी मांडलं आहे. यावर आता भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी कबीर खानला टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी टीका करतांना थेट राज्यातील सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधलाय.
काय म्हणाले अतुल भातखळकर
“मुघलाना नकारात्मक भूमिकेत पाहून त्रास होतो” हे चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यांचे वक्तव्य बाटग्या मानसिकतेचे द्योतक आहे. बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खान यांना बरे वाटावे म्हणून इतिहास बदलाता येत नाही. राज्यात ब्रिगेडी इतिहासकार सत्तेवर बसल्याचे परीणाम.’